Sangli News | सांगली : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या धनगर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू असून, या संघर्षात काही धनगर बांधवांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू पावलेले व्यक्ती बहुतांश कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत असल्याने त्यांच्या निधनामुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविका, शिक्षण आणि भविष्यातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच प्रत्येक पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.
या वेळी आमदार बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते. धनगर समाजाच्या न्यायहक्कांसाठी सुरू असलेला लढा ठामपणे आणि सातत्याने सुरू राहील, असेही आमदार पडळकर यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










