Dhangar Reservation: धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांसाठी मदत व नोकरीची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Dhangar Reservation Victims Government Job Financial Aid Demand Sangli | फोटो सौजन्य : gopichand__padalkar_ (Instagram)

Sangli News | सांगली : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या धनगर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू असून, या संघर्षात काही धनगर बांधवांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू पावलेले व्यक्ती बहुतांश कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत असल्याने त्यांच्या निधनामुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविका, शिक्षण आणि भविष्यातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच प्रत्येक पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.

या वेळी आमदार बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित होते. धनगर समाजाच्या न्यायहक्कांसाठी सुरू असलेला लढा ठामपणे आणि सातत्याने सुरू राहील, असेही आमदार पडळकर यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा