सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी जाहीर करण्यात आलेल्या मतदान दिनांकाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ ही मतदान तारीख निश्चित केली आहे. मात्र, याच दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी श्री मायाक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याकडे आमदार पडळकर यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मायाक्का देवी यात्रेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असून, हजारो बैलगाड्या घेऊन लाखो नागरिक या यात्रेसाठी यात्रेला जातात. अशा परिस्थितीत मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर मतदान दिनांक ५ फेब्रुवारी ऐवजी पुढील काही दिवसांवर हलविण्याचा विचार करावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेतली, तसेच निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनानुसार, या विषयावर पुढील निर्णय घेण्यापूर्वी सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्याची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: मतमोजणीची जय्यत तयारी; ५२७ मतदान केंद्रांची मोजणी, १० फेऱ्यांत निकाल.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










