वाळवा : कार्वे गावात दोन दिवस पाच वर्षांच्या चिमुरडीच्या कथित अपहरणामुळे भीतीचे वातावरण होते. अज्ञात व्यक्तीने किंवा बिबट्याने मुलीला पळवून नेल्याच्या चर्चांनी गाव ढवळून निघाले होते. मात्र कुरळप पोलिसांच्या तपासात हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे उघड झाले असून, मुलीच्या आईनेच तिला ओळखीच्या नातेवाईकांकडे पाठवून अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले आहे.
दि. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्वे येथून पाच वर्षांची आर्यन्सी प्रकाश चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आजोबांनी कुरळप पोलिस ठाण्यात दाखल केली होती. अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना दुसऱ्याच दिवशी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. दि. 9 फेब्रुवारी रोजी मुलगी शास्त्रीनगर, मलकापूर (ता. कराड) येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने तत्काळ तेथे जाऊन मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.
यानंतर झालेल्या चौकशीत अपहरणाचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले. मुलीची आई शिवानी प्रकाश चव्हाण (वय 24) हिनेच मुलीला नातेवाईकांकडे पाठवून नंतर अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा: सांगली महानगरपालिकेची 66 कोटींची घरपट्टी वसुली; नागरिकांच्या तक्रारींसाठी दर गुरुवारी 3 ते 5 विशेष वेळ.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










