वाळवा : कार्वे गावात दोन दिवस पाच वर्षांच्या चिमुरडीच्या कथित अपहरणामुळे भीतीचे वातावरण होते. अज्ञात व्यक्तीने किंवा बिबट्याने मुलीला पळवून नेल्याच्या चर्चांनी गाव ढवळून निघाले होते. मात्र कुरळप पोलिसांच्या तपासात हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे उघड झाले असून, मुलीच्या आईनेच तिला ओळखीच्या नातेवाईकांकडे पाठवून अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले आहे.
दि. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्वे येथून पाच वर्षांची आर्यन्सी प्रकाश चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आजोबांनी कुरळप पोलिस ठाण्यात दाखल केली होती. अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना दुसऱ्याच दिवशी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. दि. 9 फेब्रुवारी रोजी मुलगी शास्त्रीनगर, मलकापूर (ता. कराड) येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने तत्काळ तेथे जाऊन मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.
यानंतर झालेल्या चौकशीत अपहरणाचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले. मुलीची आई शिवानी प्रकाश चव्हाण (वय 24) हिनेच मुलीला नातेवाईकांकडे पाठवून नंतर अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा: सांगली महानगरपालिकेची 66 कोटींची घरपट्टी वसुली; नागरिकांच्या तक्रारींसाठी दर गुरुवारी 3 ते 5 विशेष वेळ.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










