Jath : जतपूर्व भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Jath Rain Crop Damage Sangli

Sangli Rain News | जत : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जतपूर्व भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत असून, शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका भुईमूग, बाजरी, तूर, उडीद तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू अशा फळबागांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी उसाच्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

माडग्याळ, तिकोंडी, उमदी, सोनलगी, बोर्गी बुद्रुक-खुर्द, हळ्ळी, बालगाव, माणिकनाळ, अक्कळवाडी, गिरगाव, जालीहाळ यासह बोर नदी परिसरात पिकांचे, घरांचे आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी द्राक्षबागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. सुपीक जमीन वाहून गेल्याने उत्पादनावरही दीर्घकालीन परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

अनेक गावांमध्ये घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अक्कळवाडी, मोरबगी, हळ्ळी या ठिकाणी तब्बल दोनशे घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. परिणामी उघड्यावर संसार सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना तातडीची मदत कधी मिळणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. स्थानिक नागरिक मात्र शासनाने लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करत आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. (Photo Courtesy: X)

हेही वाचा: सांगलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शेतपिकांचे मोठे नुकसान.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा