मित्रासाठी घर सोडलं! विट्यातील नववीतील दोन मित्रांचा टोकाचा निर्णय; विट्यातून थेट गाठल कराड

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
काकाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून विट्यातील नववीतील दोन मुलांनी घर सोडून गाठले कराड. | प्रतिनिधिक छायाचित्र

विटा : घरगुती त्रासाला कंटाळून विटा येथील नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मित्रांनी सोमवारी सकाळी घर सोडून थेट कराड गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या शोधात फिरत असताना कराड शहर पोलिसांनी दोघांनाही सुरक्षित ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, विट्यातील दोघे जिवलग मित्र दररोज एकत्र शाळेत जात येत असत. त्यापैकी एकाला घरात काकाकडून वारंवार मारहाण होत होती. हा प्रकार त्याने आपल्या मित्राला सांगितला. मित्राचा त्रास ऐकून व्याकुळ झालेल्या दुसऱ्या मुलानेही त्याच्यासोबत घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

दोघांनीही घरातील कपडे बॅगेत भरले व थेट कराड गाठले. कराड मधील बिरोबा मंदिर परिसरातील एका कपड्याच्या दुकानात बसलेल्या कार्वे येथील सुरेश थोरात यांच्याकडे त्यांनी येथे काही काम मिळेल काय अशी विचारणा केली. संशय आल्याने तसेच मुलांची काळजी वाटल्याने थोरात यांनी दोघांशी आपुलकीने संवाद साधून तत्काळ कराड शहर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

दोघांना कराड पोलिस ठाण्यात आणण्यात आले, चौकशीदरम्यान एकाने घरात काकाकडून होणाऱ्या मारहाणीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांची समजूत काढत त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व संबंधित पालकांना कराड येथे बोलावण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलांनी घर सोडून पळून जाण्याची ही घटना कुटुंबीय, शिक्षक आणि समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. घरातील तणाव आणि संवादाचा अभाव मुलांना टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.

हेही वाचा: पेन्शन काढायला गेलेल्या दिव्यांग पादचाऱ्याचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू; ईश्वरपूर बसस्थानकाजवळ दुर्घटना.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा