Sangli News | ईश्वरपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे 10 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी सांगलीवाडी टोलनाक्याजवळ चारजण चोरीचा माल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, तब्बल 3 किलो 440 ग्रॅम चांदीचे दागिने, रोकड आणि दोन दुचाकी आढळून आल्या.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये
प्रदीप हणमंत थोरात (रा. बोरगाव, ता. वाळवा), गणेश ऊर्फ अजित मागनगिरी (रा. सांगोले), सुरेश कोळी (रा. कोल्हापूर) आणि आकाश सावंत (रा. लेंगरे, ता. खानापूर) यांचा समावेश आहे. टोळीतील राजकुमार मच्छवे (रा. दरफळ, जि. धाराशिव) हा संशयित सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिस चौकशीत आरोपींनी ताकारी बसस्थानकाजवळील ‘महालक्ष्मी’ सराफी दुकानाची भिंत फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरीत सुमारे 9.34 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी सराफी दुकानदार महेश पाटील यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपीस अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असून, इतर गुन्ह्यांशी संबंध तपासला जात आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीमुळे महापालिकेच्या तिजोरीत चार दिवसांत 1 कोटींची भर.
- विश्रामबाग मंगळवार बाजार चौकात नाला तुंबण्याची भीती; नाल्यात झाडी वाढल्याने सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष









