सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर गावात कौटुंबिक वादातून सरपंच महिलेसह नातेवाईकांना शिवीगाळ करत कोयता घेऊन अंगावर धावून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित व्यक्तीविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कवलापूरच्या सरपंच सुषमा शरद पाटील यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची भाची सानिका हिचा तिचा पती बाजीराव शिवाजी नलावडे (रा. नलावडे गल्ली, कवलापूर) याच्याशी कौटुंबिक वाद सुरू असून, पत्नीला वारंवार मारहाण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी सरपंच पाटील, त्यांची बहीण संगीता बिले, भाचा रोहन बिले आणि नातेवाईक अमर पवार हे सोमवारी संशयिताच्या घरी गेले होते. त्यावेळी संशयिताने अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली. त्यानंतर तो घरात जाऊन वैरण कापण्याचा कोयता घेऊन बाहेर आला आणि सरपंच पाटील यांच्या अंगावर धावून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याच दिवशी सायंकाळी संशयिताने सरपंच पाटील यांचे पती शरद पाटील यांच्या अंगावरही कोयता घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांगली ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: 20 लाखांवरील रस्ते व इमारत कामांसाठी COEP कडून थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; महापालिका आयुक्त सत्यम गांधी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










