Miraj News : मिरज–पंढरपूर महामार्गावर RTO अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणुक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री एक गंभीर प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. RTO अधिकारी असल्याचे भासवून एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या व्यक्तींनी धान्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरदस्तीने अडवून कांद्याची पोती उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील काही शेतकरी आपली कांद्याची वाहतूक बेळगावकडे करत असताना रात्री सुमारे २ वाजता नागज फाट्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली. स्कॉर्पिओ वाहनातील व्यक्तींनी आपण RTO अधिकारी असल्याचे सांगत वाहनाची कागदपत्रे तपासली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही “ट्रकमधील पाच कांद्याची पोती द्या, अन्यथा गाडी पोलीस ठाण्यात जमा करू” अशी धमकी देण्यात आली.

या घटनेत संबंधित व्यक्तींनी कांद्याची पोती आपल्या खासगी स्कॉर्पिओ वाहनात टाकून तेथून निघून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित स्कॉर्पिओ वाहनाच्या मागील बाजूस ‘पोलीस’ असे लिहिलेले असल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केली आहे. महामार्गावर अशा प्रकारे अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यास ती गंभीर बाब असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी अद्याप पोलीस किंवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, शेतकरी संघटनांकडून या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: सांगली महापालिकेत शिवसेनेसह सत्ता स्थापनेचे संकेत; अजित पवार गटालाही सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका – चंद्रकांत पाटील.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा