ईश्वरपूर : पेठ-सांगली मार्गावरील ईश्वरपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 50 वर्षीय पादचारी ध्रुवकुमार मधुकर कदम (रा. मसुचीवाडी) यांचा मृत्यू झाला. ते दिव्यांग असून पेन्शन काढण्यासाठी ईश्वरपूरला आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुवकुमार कदम हे बसस्थानकातून बाहेर पडून बँकेकडे चालत जात असताना पेठकडून येणाऱ्या दुचाकीने (एमएच 10 एटी 5767) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत ते रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघातात दुचाकी चालक संग्राम रामदास पाटील (वय 24, रा. बुधगाव, ता. मिरज) हाही गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुपारी ध्रुवकुमार कदम यांचा मृत्यू झाला.
कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ईश्वरपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा: २५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; राजवाड्यात खोकी हटवण्यावरून महापालिका-व्यावसायिक आमनेसामने.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










