मिरज : दुष्काळी जत तालुक्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा म्हैसाळ-जत विस्तारित उपसा सिंचन योजनेतील बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. प्रकल्पातील बोगद्याचा ‘ब्रेकथ्रू’ झाल्याने लाभ क्षेत्रातील 65 गावांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 26 हजार 500 हेक्टर असून पाणी वापर क्षमता 5 टीएमसी इतकी आहे. लाभ क्षेत्रात जत तालुक्यातील पूर्णतः वंचित 48 गावे आणि अंशतः वंचित 17 गावे अशी एकूण 65 गावे समाविष्ट आहेत.
₹1028.68 कोटींच्या निविदा कामापैकी सुमारे 57 किलोमीटर लांबीच्या कामांपैकी 51 किलोमीटर म्हणजेच 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. तीन पंपगृहांपैकी एकाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन पंपगृहांची कामे सुरू आहेत. प्रकल्पातील दोन वितरण कुंडांचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.
या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच जतच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार आहे. दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा: राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा.
- विश्रामबाग मंगळवार बाजार चौकात नाला तुंबण्याची भीती; नाल्यात झाडी वाढल्याने सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष









