ईश्वरपूर : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून ऊस वाहतूकदाराची सुमारे ८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील एका मुकादमावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर झाल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश दिनू चव्हाण (वय 44, रा. कामेरी) हे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. सन 2025–26 च्या ऊस गळीत हंगामासाठी विजापूर जिल्ह्यातील मोहन जयसिंह राठोड (रा. बाराकोटी तांडा, ता. विजापूर) या मुकादमाने त्यांना १२ ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनावर विश्वास ठेवून चव्हाण यांनी १६ जून ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऊस हंगामासाठीची उचल म्हणून रोख व ऑनलाईन माध्यमातून एकूण ८ लाख ४५ हजार रुपये दिले. मात्र, ऊस हंगाम सुरू होऊनही मजूर उपलब्ध करून दिले गेले नाहीत.
पैसे परत मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेश चव्हाण यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मोहन जयसिंह राठोड याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










