Jath News Today | सांगली : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीत केलेली गुंतवणूक आणि मेहनत या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली असून अनेक घरांची पडझड झाल्याने कुटुंबांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
रविवारी माजी आमदार, विक्रमसिंह सावंत आणि खासदार विशाल पाटील यांनी जत तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी व वेदना प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. पाहणीदरम्यान प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले गेले तसेच राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
संकटाच्या या काळात शेतकरी बांधवांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी माहिती या पाहणीवेळी देण्यात आली.
हेही वाचा: इस्लामपूर अपघातातील जखमी पेठच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.



