कवठेमहांकाळ : तालुक्यातील अलकुड एम येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डिजिटल आयडेंटिटी प्रणालीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थी शाळेत आल्यावर आणि शाळा सुटल्यानंतर पालकांना मोबाईलवर त्वरित संदेश जातो.
विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ओळखपत्रावर स्कॅनर लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून सकाळी उपस्थितीवेळी स्कॅन केल्यानंतर संबंधित पालकांना विद्यार्थी शाळेत पोहोचल्याचा संदेश जातो. तसेच शाळा सुटल्यानंतर पुन्हा स्कॅनिंग केल्यावर विद्यार्थी शाळेतून घरी निघाल्याची माहिती पालकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे जाते.
शाळा प्रशासनाच्या मते, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक व शिक्षकांची चिंता कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अलकुड एम येथील अंगणवाडीतही अशाच प्रकारचा प्रयोग सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
डिजिटल आयडेंटिटी प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद अधिक अचूक होत असून, पालकांना त्यांची मुलं शाळेत पोहोचल्याची आणि शाळेतून घरी निघाल्याची थेट मोबाइलवर माहिती मिळत असल्याने पालकांमधून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा: 28 फेब्रुवारीपर्यंत कर भरा, नाहीतर वेतन थांबणार; आयुक्तांचा मनपा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










