माधवनगरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; मतदारांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
माधवनगर परिसरात पाणीपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी.

मिरज : सांगली शहरालगतच्या माधवनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे पडसाद स्थानिक निवडणूक मतदानावर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माधवनगरमध्ये सुमारे सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना गैरसोयींचा मोठा सामना करावा लागला. निवडणुकीच्या दिवशी सकाळी काही ठिकाणी पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी या कालावधीत झालेल्या त्रासाबद्दल स्थानिकांमधून असंतोष व्यक्त करण्यात येत होता.

“पाणीपुरवठा नियमित नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम झाला. प्रशासनाने याकडे वेळेत लक्ष द्यायला हवे होते,” अशी भावना काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, माधवनगरमध्ये दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी राहिल्याचे सांगितले जाते. काही प्रभागांमध्ये मतदान सुमारे 45 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे सांगितले जाते, तर इतर भागांत सरासरी 52 ते 55 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, शेजारच्या बुधगाव, कवलापूर, बिसूर, कावजी खोतवाडी आणि वाजेगाव परिसरात मात्र मतदानासाठी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला. संबंधित जिल्हा परिषद मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याने निकालाबाबत उत्सुकता कायम आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून नियमित व सुरळीत पाणी पुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली असून, या प्रश्नाचा निवडणुकीच्या निकालावर कितपत आणि काय परिणाम होतो याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन आज; मुख्यालयात सकाळी 10.30 वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा