सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर गावात कौटुंबिक वादातून सरपंच महिलेसह नातेवाईकांना शिवीगाळ करत कोयता घेऊन अंगावर धावून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित व्यक्तीविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कवलापूरच्या सरपंच सुषमा शरद पाटील यांनी या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची भाची सानिका हिचा तिचा पती बाजीराव शिवाजी नलावडे (रा. नलावडे गल्ली, कवलापूर) याच्याशी कौटुंबिक वाद सुरू असून, पत्नीला वारंवार मारहाण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी सरपंच पाटील, त्यांची बहीण संगीता बिले, भाचा रोहन बिले आणि नातेवाईक अमर पवार हे सोमवारी संशयिताच्या घरी गेले होते. त्यावेळी संशयिताने अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली. त्यानंतर तो घरात जाऊन वैरण कापण्याचा कोयता घेऊन बाहेर आला आणि सरपंच पाटील यांच्या अंगावर धावून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याच दिवशी सायंकाळी संशयिताने सरपंच पाटील यांचे पती शरद पाटील यांच्या अंगावरही कोयता घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांगली ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: 20 लाखांवरील रस्ते व इमारत कामांसाठी COEP कडून थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; महापालिका आयुक्त सत्यम गांधी.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










