सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडमच्छिंद्र गावात शेजाऱ्यांमधील वादातून एका दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सायंकाळी घडली. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येडमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे बापुराव जयसिंग पाटील (वय 40) हे सायंकाळी आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. यावेळी दारात उंदीर सोडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून रमेश पाटील, महावीर पाटील, संकेत पाटील आणि श्रेयश पाटील यांनी संगनमत करून बापुराव पाटील यांच्यावर लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीच्या घटनेत बापुराव पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनाही ढकलून जखमी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा: सांगली ‘महापालिकेवर भाजपच कमळ फुलेल’; आमदार सुरेश खाडे यांचा दावा.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










