सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडमच्छिंद्र गावात शेजाऱ्यांमधील वादातून एका दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सायंकाळी घडली. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येडमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे बापुराव जयसिंग पाटील (वय 40) हे सायंकाळी आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. यावेळी दारात उंदीर सोडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून रमेश पाटील, महावीर पाटील, संकेत पाटील आणि श्रेयश पाटील यांनी संगनमत करून बापुराव पाटील यांच्यावर लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीच्या घटनेत बापुराव पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनाही ढकलून जखमी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा: सांगली ‘महापालिकेवर भाजपच कमळ फुलेल’; आमदार सुरेश खाडे यांचा दावा.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










