सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडमच्छिंद्र गावात शेजाऱ्यांमधील वादातून एका दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सायंकाळी घडली. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येडमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे बापुराव जयसिंग पाटील (वय 40) हे सायंकाळी आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. यावेळी दारात उंदीर सोडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून रमेश पाटील, महावीर पाटील, संकेत पाटील आणि श्रेयश पाटील यांनी संगनमत करून बापुराव पाटील यांच्यावर लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीच्या घटनेत बापुराव पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनाही ढकलून जखमी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा: सांगली ‘महापालिकेवर भाजपच कमळ फुलेल’; आमदार सुरेश खाडे यांचा दावा.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









