सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडमच्छिंद्र गावात शेजाऱ्यांमधील वादातून एका दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सायंकाळी घडली. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येडमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे बापुराव जयसिंग पाटील (वय 40) हे सायंकाळी आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. यावेळी दारात उंदीर सोडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून रमेश पाटील, महावीर पाटील, संकेत पाटील आणि श्रेयश पाटील यांनी संगनमत करून बापुराव पाटील यांच्यावर लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाणीच्या घटनेत बापुराव पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनाही ढकलून जखमी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा: सांगली ‘महापालिकेवर भाजपच कमळ फुलेल’; आमदार सुरेश खाडे यांचा दावा.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










