मिरज तालुक्यातील माधवनगरमध्ये मतदानावर बहिष्कार; मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांचा निषेध

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
मिरज तालुक्यातील माधवनगर परिसरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : मिरज तालुक्यातील माधवनगर परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि दीर्घकाळ प्रलंबित विकास कामांच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

माधवनगरमधील अष्टविनायकनगर परिसरातील सुमारे 300 हून अधिक मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. रस्ते, गटारी, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून कायम असून, त्यावर ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांच्या बहिष्काराच्या निर्णयाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह परिसराला भेट दिली. यावेळी विकास कामांना मंजुरी मिळाल्याचे सांगत लवकरच कामे सुरू होतील, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र, यापूर्वी मंजूर असलेलीच अनेक कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे सांगत नागरिकांनी मतदानावर बहिष्कार कायम ठेवला.

शनिवारी मतदानाच्या दिवशी सकाळपासून अष्टविनायकनगर परिसरातील लोक मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले नाहीत. काही नागरिकांनी माध्यमांशी बोलताना गेल्या 10 ते 15 वर्षांपासून परिसरातील समस्या तशाच असल्याचे सांगितले. घरपट्टी व पाणीपट्टी भरूनही आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

मतदान करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने आमचा निषेध नोंदवण्यासाठी आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकणे हा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची भूमिका नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे मिरज तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावाचा मतदानावर बहिष्कार; सकाळपासून केले नाही एकानेही मतदान.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा