मिरज : शिवजयंतीनिमित्त गुरुवारी मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरात सादर करण्यात आलेल्या ‘श्रीमंतयोगी’ महानाट्याने प्रेक्षकांना अक्षरशः चारशे वर्षे मागे नेले. अडीच तास विना-मध्यंतर सादर झालेल्या या प्रयोगाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
सांगलीतील स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या या नाट्यात शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग रंगमंचावर उभे करण्यात आले. जिजाऊंचा कणखरपणा, तानाजी मालुसरेंचा पराक्रम, तुकोबारायांचा प्रसंग अशा अनेक दृश्यांना प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळाला. नृत्य, पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनाही आकर्षक होती.
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कलाकारांचे कौतुक करत शिवरायांची तत्त्वे केवळ वाचून न थांबता ती आचरणात आणण्याचे आवाहन केले. लेखक राजेंद्र पोळ यांच्या संहितेचा आणि कलाकारांच्या ऊर्जेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: संजयनगरमध्ये जावयाचा संताप; ‘बायकोला माहेरहून परत पाठवा’ म्हणत सासूवर लोखंडी कड्याने हल्ला.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










