सांगली : वाळवा तालुक्यातील पेठ गावात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईविरोधात शुक्रवारी (दि. 10) संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील पाणी प्रश्नावर सातत्याने आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. “पाण्याचे गाजर दाखवून सत्ता मिळवली, आता जनतेची दिशाभूल थांबवा,” अशा शब्दांत आंदोलकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
बाजारपेठेतून थेट ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा
पेठ गावातील बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर पोहोचला. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना जाब विचारत पाणी प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. महिलांनी आघाडी घेत या आंदोलनात सहभाग घेतल्याने मोर्चाने विशेष लक्ष वेधले.
स्थानिक नेते व ग्रामस्थांची उपस्थिती
या आंदोलनाला स्थानिक नेते सम्राट महाडिक, माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, रामोशी समाजाचे नेते मोहन मदने, माजी सरपंच मीनाक्षीताई महाडीक, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका तेजस्वीताई महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच माजी उपसरपंच शंकर पाटील, भारती कांबळे, वसुधा दाभोळे, राधाताई हवलदार, अमृता भोसले, अल्फिया ढगे, साक्षी हराळे, शोभा शिणगारे, नीताताई भोसले, प्रशांत कदम यांच्यासह राहुल पाटील, विकास दाभोळे, आसिफ जकाते, आमीर ढगे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
“प्रश्न सुटला नाही तर आंदोलन तीव्र करू”
पाणी प्रश्नावर लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
दरम्यान, या प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
हेही वाचा: २५ लाखांच्या सावकारी वसुलीसाठी घरात घुसून दमदाटी; महिलेचा विनयभंग, खासगी सावकारावर गुन्हा दाखल.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










