Adarsh Gaon : सांगली जिल्ह्यातील हे गाव बनत आहे ‘आदर्श गाव’; लोकसहभागातून बदलले चित्र

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि सामूहिक प्रयत्नांतून समडोळी गाव बनत आहे ‘आदर्श गाव’. | फोटो : Sangli Today

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील समडोळी गाव सध्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून हे गाव ‘आदर्श गाव’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या चौकटीत गावात विविध पातळ्यांवर उपक्रम राबवले जात असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये डिजिटल सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. गावातील सर्व शाळा डिजिटल पद्धतीने कार्यरत असून, ग्रामपंचायतीचे दाखले व सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आवश्यक सेवा मिळू लागल्या आहेत.

समडोळी गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा योजनेबरोबरच ओला व सुका कचरा वर्गीकरण व संकलनाची व्यवस्था राबवली जात आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी QR Code आधारित प्रणाली सुरू करण्यात आली असून, त्यामुळे करभरणा प्रक्रियेत सुलभता आली आहे.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही गावात विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत अनिमिया तपासणी मोहीम, तसेच अंगणवाड्यांमध्ये परसबाग विकास करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी गावातील प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

याशिवाय, ग्रामस्थांच्या सहभागातून ‘शिवार फेरी’सारखे उपक्रम राबवले जात असून, शेती, पर्यावरण आणि गावपातळीवरील समस्या यावर थेट संवाद साधला जात आहे. विविध शासकीय प्रमाणपत्रांद्वारे सन्मानित झालेले समडोळी गाव प्रशासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून विकासाचा आदर्श उभा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

समडोळी गावचा हा विकास केवळ प्रशासनाचा नसून, प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाचा, प्रत्येक समडोळीकरांच्या जिद्दीचा आणि सोबतीचा आहे.

हेही वाचा: सांगली महापालिकेत उमेदवारी अर्जांचा गोंधळ; शेवटच्या दिवशी शेकडो अर्ज दाखल.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा