सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी जाहीर करण्यात आलेल्या मतदान दिनांकाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ ही मतदान तारीख निश्चित केली आहे. मात्र, याच दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी श्री मायाक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याकडे आमदार पडळकर यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मायाक्का देवी यात्रेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असून, हजारो बैलगाड्या घेऊन लाखो नागरिक या यात्रेसाठी यात्रेला जातात. अशा परिस्थितीत मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर मतदान दिनांक ५ फेब्रुवारी ऐवजी पुढील काही दिवसांवर हलविण्याचा विचार करावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेतली, तसेच निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनानुसार, या विषयावर पुढील निर्णय घेण्यापूर्वी सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्याची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: मतमोजणीची जय्यत तयारी; ५२७ मतदान केंद्रांची मोजणी, १० फेऱ्यांत निकाल.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









