सांगली : शहरातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सांगली पोलिसांच्या वतीने वाळवा तालुक्यातील पेठ नाका परिसरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.१५ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात वाहतूक शाखा ईश्वरपूर, महामार्ग पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच अदानी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम राबवण्यात आला.
या पथनाट्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रस्ता अपघातांचे भयावह परिणाम प्रभावी आणि वास्तवदर्शी पद्धतीने सादर केले. त्यांच्या सादरीकरणातून अपघातांमुळे होणारे मानवी, सामाजिक आणि आर्थिक नुकसान ठळकपणे मांडण्यात आले.
पथनाट्यात हेल्मेट व सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व, वेगमर्यादा पाळण्याची गरज, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, याबाबत ठोस आणि परिणामकारक संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला नागरिक, वाहनचालक तसेच कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उपक्रमाचे स्वागत केले. अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांमुळे रस्ता सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास सांगली पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोची विटंबना; आमदार रोहित पाटील यांची कारवाईची मागणी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










